♻प्रश्नमंजुषा – ०३♻
➖➖➖➖➖➖➖
पाणी उकळताना बुड़बुडे का तयार होतात?
________________________
परिपूर्ण उत्तर खालीलप्रमाणे -
पाणी उकळताना तुम्ही पाहिलं असेल. शेगडीवर पाण्यान भरलेलं पातेल ठेवलं कि थोड्या वेळाने बुडबुडे यायला सुरुवात होते. पाणी उकळताना हे बुडबुडे कसे तयार होत असतील याचं आश्चर्य तुम्हाला वाटत असेल. पाण्यामध्ये ऑक्सिजन किंवा विरघळलेले वायू असतात.जेव्हा पाणी आपण उकळवायला घेतो, तेव्हा पाण्याच तापमान वाढतं, आणि या पाण्यामध्ये असलेल्या वायूची पाण्यात विरघळण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे हे वायू पाण्यातून बाहेर पडण्यास धडपडत असतात.म्हणूनच आपल्याला पाणी उकळताना सुरुवातीला भांड्याच्या तळाला काही बुडबुडे दिसतात. पाणी अधिक उकळू लागले कि आणखी बुडबुडे दिसू लागतात. पाणी एका विशिष्ट उकलनबिंदुला पोहोचलं की हे बुडबुडे तयार होतात. पाण्याला जास्त उष्णता दिली कि त्याची वाफ व्हायला सुरुवात होते. एका विशिष्ट तापमानाला पाणी उकळण्याची आणि वाफ तयार होणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होतात त्यामुळे आपल्याला पाण्यात बुडबुडे दिसतात.
काही सदस्यांनी उत्तरे देण्याचा चांगला प्रयत्न केला..
# प्रणय गावंड - सामान्यतः पाण्यामध्ये विविध वायु विरघळलेले असतात...पाण्याला उष्णता दिली असता ते तापते व् हे वायु उष्णतेच्या प्रभावाने प्रसारण पावतात व बुडबुडंयाच्या स्वरुपात वर येतात....
# सौ. अंजली दाखोले - पाणी तापवताना बुडाशी असलेल्या पाण्याच्या कणां चे तापमान त्याच्या उत्तकलनांक पर्यन्त पोहोचते व् त्यांचे वाफ़ेत रूपांतर होऊन ते वर जाते. त्याची जागा वरचे पाणी भरून काढ़ते व् पुन्हा त्याही कणांना उष्णता मिळून ,त्याचेही वाफ़ेत रूपांतर होऊन तेही बुडबुड्याच्या रूपाने वर जाते.(कारन वाफ द्रव पाण्यापेक्षा हलकी असते.) म्हणून पाण्याचे बुडबुडे दिसतात.
# अमोल डोंगरे - जे वायु पाण्यामध्ये विरघळलेल्या अवस्थेत असतात ते उष्णते मुळे बाहेर येतात.
||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||
➡संदेश पुढे पाठवा➡
➖➖➖➖➖➖➖
पाणी उकळताना बुड़बुडे का तयार होतात?
________________________
परिपूर्ण उत्तर खालीलप्रमाणे -
पाणी उकळताना तुम्ही पाहिलं असेल. शेगडीवर पाण्यान भरलेलं पातेल ठेवलं कि थोड्या वेळाने बुडबुडे यायला सुरुवात होते. पाणी उकळताना हे बुडबुडे कसे तयार होत असतील याचं आश्चर्य तुम्हाला वाटत असेल. पाण्यामध्ये ऑक्सिजन किंवा विरघळलेले वायू असतात.जेव्हा पाणी आपण उकळवायला घेतो, तेव्हा पाण्याच तापमान वाढतं, आणि या पाण्यामध्ये असलेल्या वायूची पाण्यात विरघळण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे हे वायू पाण्यातून बाहेर पडण्यास धडपडत असतात.म्हणूनच आपल्याला पाणी उकळताना सुरुवातीला भांड्याच्या तळाला काही बुडबुडे दिसतात. पाणी अधिक उकळू लागले कि आणखी बुडबुडे दिसू लागतात. पाणी एका विशिष्ट उकलनबिंदुला पोहोचलं की हे बुडबुडे तयार होतात. पाण्याला जास्त उष्णता दिली कि त्याची वाफ व्हायला सुरुवात होते. एका विशिष्ट तापमानाला पाणी उकळण्याची आणि वाफ तयार होणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होतात त्यामुळे आपल्याला पाण्यात बुडबुडे दिसतात.
काही सदस्यांनी उत्तरे देण्याचा चांगला प्रयत्न केला..
# प्रणय गावंड - सामान्यतः पाण्यामध्ये विविध वायु विरघळलेले असतात...पाण्याला उष्णता दिली असता ते तापते व् हे वायु उष्णतेच्या प्रभावाने प्रसारण पावतात व बुडबुडंयाच्या स्वरुपात वर येतात....
# सौ. अंजली दाखोले - पाणी तापवताना बुडाशी असलेल्या पाण्याच्या कणां चे तापमान त्याच्या उत्तकलनांक पर्यन्त पोहोचते व् त्यांचे वाफ़ेत रूपांतर होऊन ते वर जाते. त्याची जागा वरचे पाणी भरून काढ़ते व् पुन्हा त्याही कणांना उष्णता मिळून ,त्याचेही वाफ़ेत रूपांतर होऊन तेही बुडबुड्याच्या रूपाने वर जाते.(कारन वाफ द्रव पाण्यापेक्षा हलकी असते.) म्हणून पाण्याचे बुडबुडे दिसतात.
# अमोल डोंगरे - जे वायु पाण्यामध्ये विरघळलेल्या अवस्थेत असतात ते उष्णते मुळे बाहेर येतात.
||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||
➡संदेश पुढे पाठवा➡
No comments:
Post a Comment